कहोना व्हायरस मुळे, वेळ आल्यानंतर आपल्या घरातील लोक कसे आणि किती स्वार्थी वागतात
सदर कहानी ही काल्पनिक आहे, याचा वास्तविक जीवनाशी,व्यक्तिशी,घटनेशी वा कोणतेही प्रसंगाशी निगडित नाही। सदर कहानीतील पात्र हे काल्पनिक आहे। याचा कोणत्याही व्यक्तीच्या नावा शी संबंध नाही।
सदर कहाणीतील रोगाचे नाव हे बदलण्यात आले आहे।।।
आबा पाटील एक निवृत्त शिक्षक आहेत. सकाळी दहा वाजेपर्यंत ते एकदम स्वस्थ दिसत होते. सायंकाळी सात वाजेपर्यंत त्यांना खूप ताप आला व कहोना संक्रमित रुग्नाची सर्व लक्षणं त्यांच्यात दिसायला लागली.
परिवारातील सदस्यांच्या चेहऱ्यावर भिती स्पष्ट दिसत होती. त्यांचे अंथरूण घराच्या बाहेर असलेल्या जुन्या खोलीत टाकले गेले जेथे त्यांचा पाळलेला कुत्रा 'मोती' बांधलेला असे.
आबांनी काही वर्षांपूर्वी एक लहान, घायाळ पिल्लू रस्त्यातून उचलून आणले होते आणि आपल्या मुलाप्रमाणे त्याला सांभाळून त्याचे नाव मोती ठेवले होते.
या खोलीत आता आबा अंथरूण आणि त्यांचा आवडता मोती आहे. दोघी मुलं सुनांनी दूर राहणे पसंत केले आणि नातवांनाही जवळ न जाण्याची तंबी दिली होती.
सरकारने प्रसिद्ध केलेल्या नंबर वर फोन करुन सूचना दिली गेली. बातमी संपूर्ण भागात पसरली होती परंतु कुणीही भेटायला आले नाही. साड़ीचा पदर तोंडावर लपेटून, हातात काठी घेतलेली शेजारची कुणी म्हातारी आई आली आणि रामरावांच्या पत्नीला म्हणाली, "अरे कोणी यांच्याजवळ जेवण दुरुन तरी सरकवून द्या, ती दवाखान्यातील लोकं तर यांना उपाशीपोटीच उचलून नेतील."
आता प्रश्र्न हा होता की, त्यांना जेवण द्यायला कोण जाणार. सुनांनी जेवणाचे ताट आपल्या सासू कडे देउन दिले. आता आबाच्या पत्नीचे हात ताट पकडताच थरथरायला लागले, पाय जसे खांबाला बांधल्यासारखे झाले.
हे बघून शेजारची म्हातारी आई म्हणाली, "अरे तुझा तर नवरा आहे, तु पण, तोंड बांधून जा आणि दूरुन ताट सरकवून दे, तो स्वतः उचलून खाऊन घेईल."
आबा सर्व चर्चा गुपचूप ऐकत होते, त्यांच्या डोळ्यात अश्रु होते आणि कापऱ्या ओठांनी ते म्हणाले, "कोणी माझ्याजवळ येऊ नका, मला भूक ही नाही."
तेवढ्यात Ambulance आली आणि आबांना Ambulance मध्ये बसायला सांगितले गेले.
आबानी घराच्या दरवाज्यावर येऊन एकदा मागे फिरून आपल्या घराकडे बघीतले. नात व नातू तोंडावर मास्क लावून पहिल्या मजल्यावरच्या खोलीतून आजोबांकडे बघत होते आणि त्या मुलांच्या मागे डोक्यावर पदर घेऊन त्यांच्या दोन्ही सुना दिसत होत्या. खालच्या मजल्यावर दोन्ही मुलं आपल्या आईसोबत दूर उभे होते.
आबाच्या मनात विचारांचे काहूर माजले होते. त्यांच्या नातीने त्यांच्याकडे बघून हात हलवून Bye केले. एका क्षणासाठी त्यांना वाटले की 'जीवनानेच त्यांना शेवटचा निरोप दिला.'
आबाचे डोळे भरून आले. त्यांनी खाली बसून आपल्या घराच्या उंबऱ्यावर डोकं ठेवलं व Ambulance मध्ये जाऊन बसले.
त्यांच्या पत्नीने लगेच पाण्याने भरलेली बादली त्या उंबरठ्यावर ओतली, जेथे रामरावाने डोके टेकवून Ambulance मध्ये बसले होते.
याला तिरस्कार म्हणा किंवा मजबूरी, पण हे दृष्य पाहून कुत्र्यालाही रडू आले. आणि आबाना घेऊन जाणाऱ्या Ambulance च्या मागे मागे जाऊ लागला.
येथून आबांच्या जीवनात नवीन twist आला.
आबा दवाखान्यात चौदा दिवस Observation मध्ये राहिले. त्यांच्या सर्व टेस्ट नाॅर्मल आल्या. त्यांना पूर्णतः स्वस्थ घोषित करून सुट्टी देण्यात आली.
जेव्हा ते दवाखान्यातून बाहेर निघाले तर त्यांना दवाखान्याच्या दरवाजावर त्यांचा कुत्रा मोती बसलेला दिसला. दोघांनी एकमेकाला मिठी मारली. एकाच्या डोळ्यांतून गंगा तर दुसऱ्याच्या डोळ्यातून यमुना वहात होती.
त्यांच्या मुलांची लांबलचक गाडी त्यांना घ्यायला येईपर्यंत ते आपल्या कुत्र्याला घेऊन दुसऱ्या दिशेने निघून गेले होते. त्यानंतर ते कधीच दिसले नाहीत.
आज त्यांच्या फोटोसह त्यांच्या हरवल्याची बातमी वर्तमानपत्रात छापून आली आहे. लिहिले आहे की 'माहिती देणाऱ्यास ४० हजार रुपये बक्षीस दिले जाईल.'
४० हजार हो, वाचून आठवले की एवढी तर त्यांची मासिक पेंशन येत असे, जी ते हसत खेळत आपल्या परिवारावर खर्च करून टाकत असत.
एक वेळ आबा च्या जागेवर स्वतःला उभे करा, आणि विचार करा की या कथेचे पात्र तुम्ही आम्ही सुुद्धा असू शकतात.
तुमचा सगळा अहंकार आणि सर्व मोह माया संपुष्टात येईल. म्हणून मी आपणा सर्वांना हात जोडून विनंती करतो की, काही पुण्य कमवा, गरीब, भुकेल्या, लाचारांची मदत करा. जीवनात काही नाही, कुणी आपले नाही. जोपर्यंत स्वार्थ आहे तोपर्यंतच सर्व तुमचे आहेत.
जीवन एक प्रवास आहे, मृत्यू त्याचे ठिकाण आहे, हेच अंतिम सत्य आहे।
आईने विचारले, मंदिर तर बंद आहे, मग नैवेद्य कोणासाठी घेऊन चालला?
मंदिरा शेजारचे आजी आजोबा तर अजून तिथेच राहतात. त्यांना द्यायला चाललो।
घरातच रहा! स्वतःचे रक्षक बना!
👇👇खरबूज हे उन्हाळ्यातील अमृत👇👇
जगात सर्वत्र येणाऱ्या या फळाच्या मूळ स्थानाविषयी वनस्पतीशास्त्राज्ञांमध्ये मतभेद असले तरी याचे मूळ तापी खोरे म्हणजेच "खान्देश" असावे असे म्हणण्यास पुरेसा वाव आहे, कारण खान्देश मधील दिवाळीपेक्षाही महत्वाचा सण म्हणजे "आखाजी / अक्षयतृतीया"
या सणाच्या दिवशी कोऱ्या घागरीची पूजा करतात कडक उन्हाळा सुसह्य व्हावा म्हणून कदाचित निसर्गाने दिलेले हे फळ एक प्रकारची देणगीच आहे.
👇खरबूज मध्ये अद्भूत असे गुणधर्म आहेत👇
१०० ग्रॅम डांगरमध्ये ९० टक्के पाणी असते
३४ कॅलरीज असतात
चरबी ०. २ ग्रॅम, जवळ जवळ ० टक्के
कोलेस्टेरॉल ० टक्के
सोडियम १६ मिलीग्रॅम
पोटॅशिअम २६७ मिलीग्रॅम
कार्बोहायड्रेट ८ ग्रॅम (साखर ८ ग्रॅम)
प्रथिने ०. ८ ग्रॅम
अ जीवनसत्व ६७ टक्के
क जीवनसत्व ६१ टक्के
आयर्न १ टक्के
ब ६ जीवनसत्व ५ टक्के
मँगनीज ३ टक्के
आजच्या पार्श्वभूमीवर क जीवनसत्वाची आवश्यकता असल्याचे सांगितले जात आहे , हे क जीवनसत्व यात भरपूर प्रमाणात आहे.
फायदे.
१. भरपूर पोषक तत्व
२. रक्तदाब नियंत्रणात राहतो
३. हाडांना मजबूती येते
४. रक्तातील साखर नियंत्रणात राहते
५. ९०% पाणी असल्याने डीहायड्रेशन होत नाही
६. त्वचेला चकाकी येते
७. शरीराची प्रतिकारक्षमता वाढते
८. चयापचय व्यवस्थित होते
९. डोळ्यांचे आरोग्य व नजर वाढते
१०. आहारात सहजरित्या समाविष्ट करता येते. .
या उन्हाळ्यात आपल्या आहारात खरबूज, डांगराचा समावेश करा.
काळजी:-
१. रात्री झोपताना खाऊ नका (सकाळी व दुपारी खाण्यास हरकत नाही)
२. खाल्ल्यावर किमान १ तासापर्यंत पाणी पिऊ नका. . .
0 टिप्पण्या